पार्थ नगरीची ग्रामपंचायत ते पालिका घोडदौड

पाथर्डी पालिका कार्यालय 

पाथर्डी – हरिहर गर्जे ) पाथर्डी गावची लोकसंख्या १५ हजारांच्या पुढे गेल्या नंतर नागरिकांच्या वाढत्या मुलभूत गरजा लक्षात घेता ३० मे १९८५ रोजी शहराला पालिका लागू झाली. मात्र तत्पूर्वी शहरातील आजाद चौकातील ग्रामपंचायत कार्यालयातून पाथर्डी गावचा प्रशासकीय कारभार चालत असे,आज अखेर ऐतिहासिक वारसा लाभलेल्या  पार्थ नगरीची ग्रामपंचायत ते  पालिका  घोडदौड जोमाने सुरु असली तरी देखील तुटपुंज्या साधन सामुग्रीने नागरिकांना सुविधा पुरवण्यात पालिका व्यवस्थापन कमी पडल्याचा दैनदिन अनुभव येत आहे.  

१९८५ पूर्वी हंडाळवाडी,तनपुरवाडी,शिरसाठवाडी अश्या शेजारील गावांचा देखील पाथर्डी ग्रामपंचायत मध्ये समावेश होत असे मात्र लोकसंख्या १५ हजारांच्या पुढे गेल्या नंतर यापैकी शिरसाठवाडी वगळून पाथर्डी  पालिका अस्तित्वात आली.पाथर्डी ग्रामपंचायतीचे शेवटचे सरपंच दिनकर पालवे हे होते. सुरवातीला तालुक्याचे दळणवळण राज्य परिवहन मंडळाच्या बस द्वारे गावातील जुन्या बस स्थानकातून चालत असे, हल्ली उच्चभ्रू लोकवस्ती समजल्या जाणाऱ्या वामनभाऊनगर,आनंदनगर त्यावेळी अस्तित्वात नव्हते मात्र शहरात साईनाथनगर,इंदिरानगर,एडके वसाहतीचा व उपनगरांचा समावेश शहरात होता मात्र वाढत्या लोकसंख्ये नुसार पाथर्डीला पालिकेचा शिक्का लागला असला तरी आजाद चौकातील ग्रामपंचायतीच्या जुन्या पाच खोल्यात पालिकेचा कारभार चालत असे, ग्रामपंचायत काळातील केवळ ८० कर्मचारी पालिके कडे वर्ग झाले.

    पाथर्डी पालिकेच्या वतीने बांधण्यात आलेले जॉगिंग पार्क  

सार्वजनिक कार्यक्रमासाठी शहरात आताच्या सारखी अलिशान मंगल कार्यालय नव्हते,जुन्या गावातील राम मंदिर तसेच हिंद वस्ती गृहातून लग्न कार्य सार्वजनिक समारंभ होत असत. पालिका अस्तित्वात आल्या नंतर सुरवातीला तहसीलदार दर्जाच्या प्रशासकानी गावगाडा हाकला, तदनंतर १७ डिसेंबर १९९१ रोजी सुभाष दगडू घोडके यांनी पहिले नगराध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला, घोडके यांनी त्यांच्या कार्यकाळात शहराला जायकवाडी तलावातून पाणी आणण्यासाठी लढा उभारला.दुसरे नगराध्यक्षपद शंकरराव मरळीकर,हिंद कुमार औटी यांनी भूषवले सुभाष घोडके यांच्या कार्यकाळात शॉपिंग सेंटरचा पायाभरणी झाली. 


सुरवातीला पालिकेला वार्षिक ४७ हजार घरपट्टी तसेच जकात कर असे एकमेव उत्पन्न होते. विकास योजनासाठी जागा मागणी प्रस्ताव प्रशासना कडे पाठवण्यात आले.एक टेम्पो व अग्निशमन गाडी असे वाहने पालिकेच्या प्रशासक कार्यकाळात दाखल झाले.मोहरी व शिरसाठवाडी तलावातून पाथर्डी गावासाठी पाईपलाईनने पिण्यासाठी पाणी येत असे, मात्र दुष्काळी परिस्थितीत वीर सावरकर मैदानातील एकमेव बोअरवेल हा शहरवासीया साठी एकमेव पाण्याचा उगम असे, मात्र याशिवाय तालुक्यातील कुत्तरवाडी तलावातून टॅकरने शहराला पाणी पुरवठा केला जात असे. शहरातील उपनगरात १९९७ साला पर्यंत नळ लाईन टाकण्यात आली. वाढते उपनगरे व स्वच्छता राखण्यासाठी हंडाळवाडी हद्दीत २००५ साली पालिकेने कचरा डेपो उभारला.

पालिकेचे बंद अवस्थेतील गोपीनाथ मुंडे वाचनालय 

शहराची लोकसंख्या ३५ हजारांच्या पुढे गेली असल्याने बाजारपेठेत वाहनतळनवीन पालिका कार्यालयवाढीव कर्मचारी संख्ये सह कर्मचारी वसाहतनागरिकांना बगीचाखेळाडूना क्रीडागणभाजी बाजारासाठी वाढीव जागा यासह नागरिकांचे उत्पन्न वाढेल यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणे आवश्यक असताना अद्यापि या मुद्द्याकडे कुणीही पाहिलेले दिसत नाही. सन २०११ च्या जनगणने नुसार २७ हजार २११ असणारी लोकसंख्या आज रोजी जवळपास ३५ हजाराच्या पुढे गेली असल्याने येथील नागरिकांना अनेक नागरी सुविधा पासून वंचित रहावे लागत आहे,मात्र तुटपुंज्या कर्मचारी व यंत्रणेच्या बळावर पालिकेचा घोद्दौड जोरात सुरु आहे. सन २०११ पासून ते आजतागायत नौकरी व शिक्षणाच्या सोईने तालुक्यासह इतरही ठिकाणहून मोठ्या संखेने नागरिक शहरात स्थाईक झाल्याने उपनगरांचा मोठा विस्तार झाला असून त्यातुलनेत पालिके कडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधा अपुऱ्या पड्त आहेत.तालुक्यात दुष्काळी परिस्थिती आहे मात्र या तुलनेत शहरात नाथसागर जलाशयातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुळे अनेक कुटुंबे उपनगरात स्थाईक झाली आहेत.२०११ साली झालेली जनगणना लक्षात घेवून पुरवण्यात येणाऱ्या गरजा आता अपुऱ्या पडू लागल्या असून उपनगरात राहणाऱ्या ३५ हजार लोकसंखेला पक्के रस्ते,बंदिस्त गटारी,पथदिवे,बगीचा,खुल्या जागा,पाणीपुरवठा पालिकेची सध्याची इमारत अपुरी असल्याने नवीन इमारत व स्वछतेसाठी अधिक वाहने आवश्यक आहेत.

कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला बंद अवस्थेतील खोलेश्वर कुस्ती आखाडा व पार्किंग  

पालिकेचे बंद अवस्थेत असलेले लोकनेते गोपीनाथ मुंडे वाचनालय कार्यान्वित होणे आवश्यक आहे. यासह नवीन खेळाडू घडण्यासाठी स्वतंत्र क्रीडांगण, नवीन पाणी पुरवठा योजना,रस्ते,पथदिवे,सांडपाणी व्यवस्थापन, बकालवस्ती वाढू नये म्हणून नगररचना नियमानुसार बांधकामे आदी आवश्यक मुद्द्यावर नियोजन होणे आवश्यक आहे .याशिवाय ईतर वाढत्या गरजा लक्षात घेता नवीन आराखड्या नुसार सुविधा पुरवण्याची अत्यंत गरज निर्माण झाली आहे.२००५ सालच्या आकृती बंधानुसार पालिका कार्यालयात १३१  कर्मचारीना मंजुरी देण्यात आली परंतु ते आस्थाई पदे असल्याने निवृत्ती नंतर पदे भरली गेली नसल्याने आज रोजी पालिकेत आरोग्य,पाणीपुरवठा व कार्यालयीन कामासाठी फक्त ९७ कर्मचारी कार्यरत आहेत हे मनुष्यबळ वाढत्या लोकसंखेच्या तुलनेत फारच अपुरी असल्याने नागरी सुविधावर मोठा ताण पडत आहे.

 

Post a Comment

0 Comments