पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन

पाथर्डी - पार्थ विद्या प्रसारक मंडळ पाथर्डी आयोजित विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा उत्कृष्ट नियोजन व आयोजन करून नुकतीच संपन्न झाली. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या प्रेरक संकल्पनेतून विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली या परीक्षेसाठी पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक शाळेतील ३०४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकून राहावा तसेच या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा या स्पर्धेची तयारी व्हावी या उद्देशाने प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली.

प्रज्ञाशोध परीक्षेचे स्वरूप व नियोजन इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा प्रमाणे करण्यात आले असून इयत्ता पहिली व दुसरी साठी १५० गुणांची तसेच इयत्ता तिसरी व चौथीसाठी दोन पेपर एकूण ३०० गुणांचे घेण्यात आले.या परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मान्यवरांनी व पालकांनी स्वागत केले. या परीक्षेची परिपूर्ण तयारी,आयोजन व नियोजन पाहून उपस्थित सर्व पालकांनी समाधान व कौतुक व्यक्त केले.

इयत्ता पहिली ते चौथी या प्रत्येक वर्गातून प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे.प्रज्ञा शोध परीक्षेसाठी परीक्षा प्रमुख ज्ञानेश्वर गायके, अनुजा कुलकर्णी, जयश्री एकशिंगे, मनिषा गायके, राधिका सरोदे, आशा बांदल, ज्योती हम्पे,, जयश्री खोर्दे,कीर्ती दगडखैर यांनी कामकाज पाहिले.

Post a Comment

0 Comments